गोपीचंद पडळकरांचं CM उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. तर पडळकर यांनी त्या पत्रात अनेक मुद्यावरून उल्लेख केला गेला आहे. तर अनेक राजकीय भूमिकेविषयी काही सवाल त्यांनी उपस्थित केले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. परंतु, राजकीय तडजोडीमुळे भविष्यात त्यांचा ‘पाकधर्जिणा’ अशी ओळख असलेल्या नेत्यांमध्ये समावेश होण्याचा धोका आहे, असे भाष्य पडळकर यांनी केलं आहे.

पडळकर यांनी एका पत्रामध्ये काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली. याबाबत सर्वप्रथम आपले अभिनंदन. खा. संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले, असे पडळकर यांनी म्हटले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या १२ नेत्यांनी हे पत्र दिले आहे. त्यावरून पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहीत प्रश्न केला आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर जनता काय ते समजून जाईल, तर, राष्ट्रीय राजकारणाकडे आपली अशी वाटचाल सुरू झालेली असताना जे मुद्दे आपण पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत. त्यांच्या अनुषंगाने मी महाराष्ट्र संदर्भात काही सवाल आज आपल्यापुढे उपस्थित करीत आहे. असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

काय म्हणाले पडळकर ?

दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासह जो सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे, त्याचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे आणि त्याचा पैसा प्राणवायू, कोरोना लस खरेदी करण्यासाठी व्हावा, अशी मागणी या पत्रात आपण केलेली आहे. मात्र, उद्धवजी…मग मंत्रालयासमोर ९०० रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेला मनोरा आमदार निवास प्रकल्प थांबवून आपण तो निधी ऑक्सिजन, कोरोना लस खरेदीसाठी करणार आहात का? तसे केल्यास महाराष्ट्र आपले कौतुकच करेल. आधी हा प्रकल्प ६०० रुपयांचा होता आता हा ९०० केला आहे. तर फडणवीस सरकारच्या काळात हे कंत्राट केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी कंपनीला देण्यात आले होते. आपल्या कार्यकाळात ते काढून घेण्यात आले आणि खासगी कंपनीला दिले जात आहे, हे कशासाठी? आणि कोणासाठी? असा पडळकर यांनी प्रश्न केला आहे.

आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. मुंबईसाठी ५० लाख लशींची खरेदी करण्यासाठीची निविदा शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने काढली आहे. मुंबई मनपाकडे असलेल्या ७९ जार कोटींच्या बचत ठेवी वेळी रयतेसाठी वापरल्या असत्या तर संपूर्ण राज्याचे लसीकरण झाले नसते का? मुंबईबरोबरच राज्यातील लहानमोठी शहरे आणि ग्रामीण भागातही लसींचा तात्काळ पुरवठा केला जाईल, असे आपण जाहीर का नाही करत? आपल्याला सामनाच्या अग्रलेखातून ‘कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला ॲाक्सिजन कोण देणार? तसेचच, PM फंड आणि अन्य अनअकाऊन्टेड फंडात (म्हणजे काय हे कळले नाही) असलेला निधी व्हॅक्सिन, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी तत्काळ द्या, अशी मागणी आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात केलीय.

तर, ही मागणी करत असतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत असलेली सर्व रक्कम ही कोरोना लढ्यासाठी देत असल्याचे आपण जाहीर केले तर आपल्या उक्ती व कृतीत कुठलीही तफावत नाही, याचे कौतुकच राज्यातील जनतेला वाटेल. तसेच, गरजूंना मोफत अन्नधान्य द्या आणि बेरोजगारांना ६ हजार रुपये महिना द्या, अशी मागणी आपण मोदीजींकडे रेटलेली आहे. त्या सोबतच आपण महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या साडेपाच हजार कोटी रुपयांपैकी किती रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात पडली याचा हिशेब आणि यादी देणार का? पुरवठादारांचं भलं करण्यासाठी आदिवासींना पैशांऐवजी खाद्यवस्तू पुरवण्याचे कंत्राट आपण रद्द करणार आहात का? या दरम्यान, शेतकरी कायदे रद्द करा आणि तसे केल्यास शेतकरी हे भारतीयाच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतील, असे आपण पंतप्रधान मोदीजींना पत्र लिहिला आहे. मात्र, म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे.