सरकारकडून 4 कोटी 39 लाख रेशनकार्ड रद्द !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने  तंत्रज्ञानाच्या मदतीने सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता  आणण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. एनएफएसए (NFSA)च्या अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी २०१३ पासून तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द केल्याचे समोर आले आहे.

रेशन कार्ड आणि लाभार्थ्यांच्या डाटाबेसचे डिजिटायझेशन केल्यानंतर, तसेच त्याला आधार कार्ड (Adhar card)शी जोडण्यात आल्यानंतर अपात्र किंवा बोगस रेशन कार्डची ओळख पटवल्यानंतर राज्य आणि  केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी २०१३ ते २०२० पर्यंत देशभरातील ४ लाख ३९ हजार रेशन कार्ड रद्द केली आहेत. त्याचबरोबर रद्द करण्यात आलेल्या रेशन कार्डच्या बदल्यात खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांना  नियमित पद्धतीने रेशन कार्ड जारी करण्यात आली आहेत.