अण्णा हजारोंच्या ‘मौन’ व्रताकडे सरकारचे ‘दुर्लक्ष’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी आदी विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी मौन आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र अण्णांच्या आंदोलनाकडे कोणीही पाहायला तयार नाही. सरकारने हे आंदोलन दुर्लक्षित केले आहे.

देशभरात महिलांवर अत्याचाराचे अनेक निकाल वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुध्दा आरोपींना अद्यापही फाशी देण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींचे धाडस वाढत चालले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत.

२०१२ पासून संसदेत ज्युडीसीईल हा कायदा प्रलंबित आहे. तो कायदा झाल्यास न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने सुटण्यास मदत होईल. पोलीस ठाण्यात महिलांना एखादी तक्रार दाखल करायची झाल्यास तेथे पुरुष कर्मचारी, अधिकारी असल्याने महिलांना माहिती सांगण्यात अडचणी येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी महिला कर्मचारी, अधिकारीच असाव्यात आधी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र अण्णा हजारे यांचे आंदोलन सरकारने दुर्लक्ष केले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/