‘मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही, म्हणूनच सरकारी वकिल गैरहजर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. न्यायालयानं आज मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील (Maratha reservation reconsideration petition) सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. यानंतर मात्र ती 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. सरकारी वकिल मुकूल रोहतगी (Mukul Rohatgi) हे खंडपीठासमोरील (The bench) आजच्या सुनावणीला गैरहजर होते. त्यामुळं हे प्रकरण पास ओव्हर (Pass Over) करण्यात आलं. मुख्या याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी सरकारी वकिलांच्या (Government lawyer) अनुपस्थितीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते.

मराठा आरक्षणातील प्रमुख याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या आजच्या सुनावणीला राज्य सरकारचे वकिल मुकूल रोहतगी अनुपस्थित राहिले. राज्य सरकारची ही चूक झाली आहे. राज्य सरकारनं वकिलांना सूचना करायला हवी होती. कदाचित सरकारला गांभीर्य नसेल म्हणूनच सरकारचे वकिल अनुपस्थित राहिले होते. आमचे वकिल सुनावणीला हजर होते. त्यामळं आमच्या वकिलांनीच सरकारची बाजू ऐकण्याची विनंती खंडपीठाला केली. त्यामुळं न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलली. मात्र सरकार अद्यापही गंभीर नसल्याचं दिसत आहे” असा आरोपही त्यांनी केला आहे.

पुढं ते म्हणाले, “राज्य सरकारच्या वतीनं सरकारी वकिलांची अनुपस्थिती असल्यानं सुनावणी पुढे ढकलली आहे. आजचं प्रकरणी 3 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे लागलेलं आहे. हे प्रकरण 5 न्यायमुर्तींकडे गेलं असून त्यासाठी न्यायमुर्तींचं खंडपीठ गठित करण्यात आलं नाही. म्हणून ही सुनावणी 3 न्यायमुर्तींच्या खंडपीठापुढे घेण्यात आली आहे. त्यामुळं लवकरात लवकर या प्रकरणासाठी 5 न्यायमुर्तींचं खंडपीठ गठित होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे” असंही पाटील यांनी संगितलं.

संभाजीराजेंची सरकारला विनंतीवजा सूचना

मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा विषय गांभीर्यानं घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे मी सरकारला नेहमी संगितलं आहे. जे कोणी समान्य वभिगाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे. त्यामुळं सरकारला माझी विनंतीपूर्वक सूचना आहे की, ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी केली आहे. एका वृत्तावाहिनीसोबत ते बोलत होते.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, “मी किती वेळा बोलायचं. माझा जीव धोक्यात घालून मी सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी गर्दीत सोशल डिस्टेंसिंग (Social distancing) न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी काम करत आहे. मी आता बोलून बोलून थकलो आहे. पूर्णपणे थकून गेलो आहे. सरकारनं ताबडतोब पावलं उचलावीत.” एवढीच विनंती असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.

वकिलांच्या अनुपस्थितीवर संभाजीराजे नाराज

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, सरकारी वकिल कुठे आहेत असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) केला जातो आणि तिथं वकिल उपस्थित नसतात हे दुर्दैव आहे. गंभीर आहे. त्यामुळं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) जिथं कुठं असतील त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं.