दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची दुसर्या राज्यात रवानगी होणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याला अधिकृतरित्या गृहमंत्रालय अथवा राष्ट्रपती भवनातून दुजोरा मिळालेला नाही. दि. 24 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी घडल्या त्या पार्श्वभुमीवर भगतसिंग कोश्यारी यांना दुसर्या राज्यात पाठविण्यात येईल अशी दिल्लीत चर्चा आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जे काही निर्णय घेतले ते सर्व संविधानाला धरून होते. मात्र, काही पक्षांकडून त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. त्यामुळेच की काय त्यांची दुसर्या राज्यात रवानगी केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची काल (मंगळवार) दिल्लीत भेट झाली. त्यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. भगतसिंग कोश्यारी यांची दुसर्या राज्यात केली जाणार असल्याची चर्चा जरी असली तरी त्यावर तात्काळ कोणाताही निर्णय येणे अपेक्षित नाही.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय