सरकारी कर्मचार्‍यांना सुट्टी नाही : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सरकारी कार्यालये आगामी 7 दिवस बंद राहणार असल्याचं वृत्त काही वेळापुर्वी सांगण्यात आलं होतं मात्र आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारी कर्मचार्‍यांना सुट्टी नसल्याचं जाहीर केलं आहे.

सरकारी कार्यालयांना आगामी 7 दिवस सुट्टी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त जवळपास सर्वच वृत्त वाहिन्यांवर झळकत होतं. आता उध्दव ठाकरे यांनी सरकारी कर्मचार्‍यांना सुट्टी नसल्याचं जाहीर केलं आहे.