सरपंचपद आरक्षण : मंत्री हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  महाराष्ट्र राज्यातील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झालेत. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता विजयी आघाड्यांना सरपंच आणि उपसरपंच निवडीचे वेध लागलंय. मात्र, यावेळी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सरपंचपदासाठीचं आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणाराय. त्यामुळे आता आरक्षणाच्या घोषणेकडे विजयी उमेदवार यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मोठी घोषणा केलीय.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यावेळी आरक्षण अगोदर जाहीर करण्यात न आल्याने मतदानामध्ये 4 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असे हसन मुश्रिफ म्हणाले. तसेच राज्यातील ग्रामपंचातींच्या आरक्षणाची सोडत पुढच्या 8 ते 10 दिवसांत घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना दिल्यात, असे हसन मुश्रिफ यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनेक ग्रामपंचातयींमध्ये सध्या प्रशासक आहेत. त्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासनातील अधिकार्‍यांकडे दिलेला आहे. एका अधिकार्‍याकडे 4-5 ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पुढच्या 8-10 दिवसांत घेऊन गावचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्याची सूचना जिल्ह्याधिकार्‍यांना दिलीय. मात्र, ग्रामसभा घेण्यास 31 मार्चपर्यंत मनाई असणार आहे, असेही हसन मुश्रिफ यांनी सांगितले आहे.