मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील 14 हजार 202 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 18) जाहीर झाले. मात्र निकालावरून अद्यापही सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यात आम्हीच नंबर 1 असल्याचा दावा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपा दोघंही करत आहेत.
भाजपाने राज्यातील 5 हजार 781 ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवल्याचे सांगितले आहे. जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली आहे असे भाजपकडून सांगतिल जात आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यभरात भाजपा 6 हजार ग्रामपंचायती जिंकणार असा दावा केला होता. भाजपाने ग्रामपंचायत निवडणूक निकालाची संपूर्ण यादीच प्रसिद्ध केली आहे. यात कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. त्याची आकडेवारीच दिली आहे.
भाजपाने जिंकलेल्या ग्रामपंचायती
अनुक्रमांक जिल्हा एकूण ग्रामपंचायती जिंकलेल्या ग्रामपंचायती
1 सिंधुदुर्ग 70 45
2 रत्नागिरी 479 59
3) रायगड 88 33
4) ठाणे ग्रामीण 151 105
5) पालघर (वसई) 3 0
6) नंदूरबार 87 27
7) धुळे 218 117
8 नाशिक 621 168
9 जळगाव 783 372
10) अहमदनगर 767 380
11) बुलढाणा 557 249
12) अकोला 225 123
13) वाशिम 163 83
14) अमरावती 553 191
15) यवतमाळ 980 419
16) वर्धा 50 28
17) नागपूर 130 73
18) भंडारा 148 91
19) गोंदिया 189 106
20) गडचिरोली 362 निकाल प्रतिक्षेत
21 चंद्रपूर 629 344
22) नांदेड 1015 442
23) परभणी 566 229
24) हिंगोली 495 191
25) जालना 475 253
26) औरंगाबाद 618 208
27) बीड 129 67
28) लातूर 383 211
29) उस्मानाबाद 428 180
30) पुणे 748 200
31) सोलापूर 658 204
32) सातारा 879 337
33) कोल्हापूर 433 189
34) सांगली 152 57
एकूण ग्रामपंचायत 14202 5781