ग्रेटा थनबर्गच्या ‘प्लॅन ट्विट’ची पोलखोल झाल्यानंतर कंगना रणौतनं साधला निशाणा, म्हणाली – ‘सगळे पप्पू एकाच टीममध्ये, जोकरांचा कळप’
पोलिसनामा ऑनलाईन – दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. यानंतर इंटरनॅशनल सेलेब्सही या आंदोलनावर मत व्यक्त करताना दिसले. रिहानानंतर ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg), एक्स अॅडल्ट स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) यांनी देखील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केलं. ग्रेटानं केलेलं ट्विट आणि पुन्हा ते डिलीट केल्यानंतर हे स्पष्ट झालं की, हे का झालं होतं. परंतु तिनं ट्विट डिलीट केल्यानंतर बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं तिच्यावर टीका केली आहे.
ग्रेटा थनबर्ग बुधवारी (दि 3 फेब्रुवारी) रोजी सोशलवर चर्चेत होती. दिवसभर भारतात ट्विटरवर ट्रेंड झाल्यानंतर ती ट्रोल होत आहे. ग्रेटानं एक गुगल डॉक्युमेंट्री शेअर केली होती. यात आंदोलनाच्या समर्थनार्थ सोशल मीडिया कॅम्पेनचं शेड्युल शेअर करण्यात आलं होतं.
— TimePass (@TimePassTalks) February 4, 2021
इतकंच नाही तर ही फाईल शेअर करताना ग्रेटानं टूलकिट हा शब्द वापरला होता. यामुळं ती निशाण्यावर आली होती. तिनं एक डॉक्युमेंट शेअर केलं होतं यात भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव बनवण्यासाठी कृती योजना शेअर करण्यात आली होती. जेव्हा ग्रेटानं ट्विट डिलीट केलं तेव्हा कंगनानं तिच्यावर निशाणा साधला.
ट्विट करत कंगनानं तिच्यावर टीका करत लिहिलं की, या बुद्धीहीन मुलीनं डाव्या लोकांना अडचणीत टाकत खूप मोठी चूक केली आहे. क्रमाक्रमानं भारताला अस्थिर करण्याच्या वैश्विक प्लॅनचं सिक्रेट डॉक्युमेंट अटॅच केलं. सर्व पप्पू एकाच टीममध्ये आहेत. हाहाहा. जोकरांचा कळप आहे.
— TimePass (@TimePassTalks) February 4, 2021
ग्रेटानं तिच्या ट्विटमध्ये भारतातील सत्ताधारी पार्टी बीजेपीला फॅसिस्ट पक्ष म्हटलं होतं. तिच्या ट्विटमधील या भाषेवरूनही सवाल केला जात आहे की, ती प्रोपोगेंडाचा हिस्सा आहे का.
ग्रेटानं तिच्या ट्विटमध्ये जी फाईल शेअर केली होती, त्यात 5 प्रमुख गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. ऑन ग्राऊंड प्रोटेस्टमध्ये भाग घेण्यासाठी जा. शेतकरी आंदोलनासोबत एकजुटतेनं आंदोलन करतानाचे फोटो ईमेल करा. हे फोटो 25 जानेवारी पर्यंत पाठवा. याशिवाय डिजिटल स्ट्राईक सोबत #AskIndiaWhy सोबत फोटो/व्हिडीओ मेसेज 26 जानेवारी पूर्वी किंवा 26 जानेवारी पर्यंत ट्विटरवर पोस्ट करावेत.
यासोबत 4-5 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर वादळ आणण्याची प्लॅनिंग, म्हणजेच शेतकरी आंदोलनाशी संबंधित गोष्टी, हॅशटॅग आऐणि फोटो ट्रेंड करण्याची योजना आहे. यासाठी फोटो आणि व्हिडीओ मेसेज 5 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात यावेत. अखेरचा दिवस हा 6 फेब्रुवारी असेल. आणकी एक तारीख सांगत लिहिण्यात आलं होतं की, स्थानिक लोकांशी संपर्क साधा. यामुळं भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढेल. हे प्रकरण समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं गेलं आहे की, परदेशी सेलिब्रिटींनी हॅशटॅग कॅम्पेनमध्ये फसू नये.