पुलवामा हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित कट, ‘या’ नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित कट होता असा खळबळजनक दावा गुजरातचे माजि मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. एव्हढेच नाही तर या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली कार ही गुजरातचीच असून या कारवरील नंबर प्लेटवर इंग्रजीत GJ असे लिहिले आहे असा दावा देखील वाघेला यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुधावारी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना वाघेला यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला ते म्हणले, “गोध्रा येथे झालेल्या हत्याकांडात भाजपचा हात होता त्याचप्रमाणे पुलवामा येथील हल्ला हा भाजपचा कट होता. यावेळी बोलताना ते पुढे म्हणले बालाकोट यथील एअर स्ट्राईक देखील षडयंत्राचा एक भाग होता. बालाकोट येथे एकही दहशतवादी मारला गेला नाही.

एकाही आंतरराष्ट्रीय संस्थेला एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवादी मारले गेल्याचे सिद्ध करता आले नाही. पुलवामा येथे गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला होता मात्र यावर दुर्लक्ष करण्यात आले. भाजपकडे बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांविषयी माहिती होती तर मग त्यांनी आधीच कारवाई का केली नाही ? पुलवामा सारख्या घटनेची ते वाट बघत होते का ? असा सवाल वाघेला यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.