Gulabrao Patil | ‘आम्ही आयुष्याचा मोठा सट्टा खेळून भाजपकडे आलो आहोत’ – गुलाबराव पाटील
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) बंड झाले आणि शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदरांनी शिवसेनेची साथ सोडली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) देखील पडले. या वर्षीचा जून महिना महाराष्ट्राच्या राजकारणात बंडाचा महिना म्हणून ओळखला गेला आहे. त्यावेळच्या बंडाची एक आठवण गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) सांगितली आहे. त्यावेळी जर का उरलेले पाच आमदार आले नसते, तर आपले काही खरे नव्हते, असे यावेळी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले.
गुलाबराव पाटील जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, साधे सरपंचपद कोणी सोडत नाही. पण, आम्ही आठ आमदारांनी मंत्रीपदावर पाणी सोडले. आम्ही आयुष्याचा मोठा सट्टा खेळून भाजपकडे आलो आहोत. आम्ही मंत्रीपद आणि पक्ष तर सोडला होता. पण, जर का आमची संख्या पूर्ण झाली नसती, तर आम्हाला मोठा परिणाम भोगावा लागला असता. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला 38 आमदारांची गरज होती. मी 33 वा आमदार होतो. आणखी जर पाच आले नसते, तर माझा कार्यक्रम आटोपला असता. मात्र, असे मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खूणगाठच डोक्यात बांधून आम्ही बाहेर पडलो होतो.
तसेच यावेळी त्यांनी सूरतला जाण्यापूर्वी आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील भेटल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गुवाहाटीला गेल्यानंतर 22 आमदारांसह मी उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो होतो.
आम्ही त्यांना 22 आमदारांना परत बोलविण्याची विनंती केली. मात्र, त्यावेळी त्यांनी आमचे ऐकले नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला जायचे असेल, तर तुम्ही पण जा.
मात्र, आम्ही त्यावेळी ठरवलेच होते, असे मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल, अशी खूनगाठ डोक्यात बांधत
आम्ही बाहेर पडलो आणि बंडात सामील झालो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil once again criticized the thackeray group
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Politics | विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं
MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील