‘आपना टाइम आयेगा’ म्हणणाऱ्या ‘गली बॉय’ चा सीक्वल येणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिनेप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ चित्रपट इतका हिट ठरला की, दिग्दर्शिका झोया अख्तरने “गली बॉय” चा सीक्वल काढणार असल्याचा विचार करत असल्याचे म्हंटले आहे.

दिग्दर्शिका झोया अख्तरने बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांना घेऊन दिग्दर्शित केलेला ‘गली बॉय’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणा-या आणि रॅपर होणाच्या स्वप्न असलेल्या एका तरूणाची ही कथा होती. ही कथा आणि रणवीर सिंगचा अभिनय प्रेक्षकांना इतका भोवला की, बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला की १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.

दरम्यान एका मुलाखतीत बोलतांना दिग्दर्शिका झोया अख्तरने म्हंटले की, गली बॉय’ च्या पुढच्या भागाबद्दल मी विचार करतेय. भारतातल्या हिप-हॉप संस्कृतीबद्दल अजून खूप काही सांगण्यासारखे आहे, असे मला आणि माझी सहलेखिका रीमा कागती आम्हा दोघींनाही वाटतेय. त्यामुळेच आम्ही आणखी एक चित्रपट करण्याचा प्लॅन करत आहोत. असे त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, ‘देशाच्या हिप हॉप संस्कृतीवर अधिक सविस्तर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट घेऊन येण्याची आमची इच्छा आहे. सध्या या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, दिग्दर्शिका झोया अख्तरचा हा पहिला चित्रपट आहे ज्यात तिचा भाऊ फरहान अख्तर दिसला नाही. आणि आगामी चित्रपटातही तो नसेल असेही तिने स्पष्ट केले आहे. तसेच, फरहान अख्तरला ‘गली बॉय’मध्ये का घेतले नाही असे विचारले असता, फरहान गली बॉय’मध्ये फिट बसत नव्हता. रॉक ऑन सारख्या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात फरहानबद्दलची एक इमेज आधीच तयार झाली होती. तो ‘गली बॉय’मध्ये असता तर लोकांच्या ते पचनी पडले नसते. त्यामुळे फरहानला ‘गली बॉय’मध्ये घेतली नाही. असेही तिने म्हंटले.

ह्याहि बातम्या वाचा

धक्कादायक ! पोरासोबत लफडं असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण ; १० वी च्या मुलीची आत्महत्या

विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध ; पालकमंत्र्यांच्या कार्यालयातच कार्यकर्त्यांची बैठक

भारताचा मोठा निर्णय ; पाकिस्तानला जाणाऱ्या ‘त्या’ तीन नद्यांचे पाणी अडविले

नैरोबीत विमान दुर्घटनेत १५७ लोक दगावल्याची भिती