‘आधी छळायचं, मागे लागून मारायचं अन् नंतर सांगायचं गोपीनाथ मुंडे असते तर खडसे मुख्यमंत्री झाले असते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आधी छळायचं, मागे लागून मारायचं, मग सांगायचं गोपीनाथ मुंडे असते तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गडावर घेण्यात आलेल्या स्वाभिमान मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांची नाराजी समोर आली. याआधीही त्यांनी माध्यमांसमोर आली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी आज पुन्हा आपली खदखद बोलून दाखवली.

एकनाथ खडसे म्हणाले, “निवडणुकीत त्यांनी माझं तिकिट कापून टाकलं, नाथाभाऊंचा गुन्हा काय ते तर सांगा. तुम्हाला खात्री आहे पण यांना खात्री पटत नाही. हेच असं भासवत आहे नाथाभाऊ आता बाहेर जा, किती आपमान सहन करता. माझ्या सहमतीशिवाय देवेंद्र फडणवीस पक्षाध्यक्ष झाले नसते. माझ्याकडे भरपूर काही आहे, फक्त येथे बोलायला वेळ नाही. हा प्रयोग आताचा नाही, हळू हळू हा प्रसंग तयार झाला, त्याला यश मिळालं.

आमच्या सारख्याला तुम्ही सांगताय पक्षाबाहेर जा. आधी छळायचं, मागे लागून मारायचं, मग सांगायचं अरे गोपीनाथ मुंडे असते तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते. मी जास्त उघड करु दाखलवं तर शिस्तभंग होईल. गोपीनाथ मुंडेची मुलगी पराजित झाली याचे दु:ख मला आहे, हे घडलं नाही घडवलं गेल, तुम्हाला मान्य आहे की नाही, मला मान्य आहे. पंकजांना बोलता येत नाही, पण त्यांच्या मनात वेदना आहेत. त्या सहन करताहेत.” असंही खडसे म्हणाले.

पुढे बोलताना खडसे म्हणाले, “भाजपमध्ये कोणीतरी छळतंय असे जानकर म्हणत आहेत. महाराष्ट्रात भाजपला उभारी देण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं नाही. जे लढायचंय ते समोर. जे बोलायचं ते समोर बोलायचं.” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/