माजी केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या ताफ्यातील गाडीचा वर्ध्यात अपघात, 2 ठार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – माजी केंद्रीय मंत्री हंजराज अहीर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला असून यामध्ये दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने जवानांची गाडीची धडक कंटेनरला बसली. अपघातावेळी गाडीमध्ये सात जण होते. हंसराज अहीर यांची गाडी पुढे असल्याने ते थोडक्यात बचावले. हा अपघात चंद्रपूरहून नागपूरला जात असताना जमजवळच्या कांडळी नदीजवळ सकाळी सकाळी 8.30 च्या सुमारास झाला.

अपघाताच्यावेळी गाडीमध्ये मनोज झाडे, विजयकुमार, फजलीभाई पटेल, एम.जी. साजिद, जयदीपकुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगट हे सर्व आरपीएफचे जवान गाडीत होते. अपघातामध्ये गाडीचा चालक मनोज झाडे (वय-37 रा. चंद्रपूर) आणि सीआरपीएफचा जवान फलजीभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला.
हंसराज अहीर हे चंद्रपूरहून नागपूरला जात असताना हा अपघात झाला.

अहीर यांच्या ताफ्यातील वाहने वेगात जात असताना समोरच्या कंटेनर चालकाने माकडला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या अहीर यांच्या ताफ्यातील जवानांच्या जीपची धडक कंटेनरला पाठीमागून बसली. हा अपघात इतका भीषण होता की, ताफ्यातील अपघातग्रस्त गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.

Visit : policenama.com