जया बच्‍चन यांचा कोणता निर्णय आजतागायत कायम राहिला ? जाणून घ्या..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या सगळ्यात सुपरहिट जोडी म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखा यांची होती. त्यांच्या जोडीची चर्चा कायम होती. आजही रेखा आणि अमिताभ एखाद्‍या कार्यक्रमात एकत्र किंवा समोरासमोर आले तरी चर्चा होतात. जया बच्चन सोबत लग्न होऊन देखिल अमिताभ रेखा च्या प्रेमात होते. यामुळे अमिताभ यांच्या वैयक्तिक आयुष्यात खुप संकटे आले असे समजते. रेखा-अमिताभ बच्‍चन यांचे हिट होणारे चित्रपट आणि दुसरीकडे त्‍यांच्‍या अफेअरची चर्चा; त्‍यामुळे जया यांनी निर्णय घेतला…कोणता निर्णय ? ते जाणून घ्या…..

अमिताभ आणि रेखाची चित्रटाच्या निमित्ताने वाढती जवळीक पाहून जया नेहमी चिंतेत असायच्या. अमिताभ नेहमी रेखाच्या एका मित्राच्या बंगल्यावर भेटायचे. परंतू, त्यांचे प्रेम एका प्रसंगामुळे समोर आले. ज्यावेळी ‘गंगा की सौगंध ‘ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सहाय्यक अभिनेत्याने रेखाला अपमानास्पद वागणूक दिली. त्यावेळी अमिताभ प्रचंड चिडले होते. याच प्रसंगामुळे त्यांचे प्रेम उघड झाले.

ज्या ज्या वेळी जया अमिताभ आणि रेखा यांचा चित्रपट परिवारासोबत पहायला जात. तेव्हा जया यांच्या चेहऱ्यावर नेहमी नाराजी दिसत. कालांतराने हे अमिताभ ला कळून चुकले. या दोघांची वाढती जवळीक पाहून जया यांनी अमिताभ कडे नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी रेखासोबत कुठलाही चित्रपट न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

ज्या वेळी ‘सिलसिला’ चे शुटिंग सुरु होते. यावेळी सुद्धा यश चोप्रा यांनी जेव्हा रेखा आणि अमिताभ यांना चित्रपटामध्ये एकत्र काम करण्याचे सांगितले. तेव्हा अमिताभ यांनी त्यांना स्पष्ट सांगितले. जोपर्यंत जया रेखासोबत काम करण्याची परवानगी देत नाही. तोपर्यंत मी हा चित्रपट करणार नाही. यानंतर यश यांनी जया यांना समजून सांगितले तेव्हा जया यांनी आपण स्वतः ‘सिलसिला’ मध्ये काम करु अशी अट समोर ठेवली. जया यांच्या निर्णयामुळे नंतर अमिताभ आणि रेखा यांचे भेटणे बंद झाले. यादोघांचा ‘सिलसिला’ चित्रपट अखेर शेवटचा चित्रपट ठरला. जया यांनी रेखा सोबत कुठल्याही चित्रपटात अमिताभ यांनी कधी न काम करण्याचा जो निर्णय घेतला, तो आजतागायत कायम राहिला.