देशांतर्गत विमान सेवेस देश तयार, 7 सेक्शनमध्ये विभागले गेले रूट, तिकीटांच्या दराची मर्यादा निश्चित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे जवळपास दोन महिने लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर, देश आता सामान्य स्थितीकडे वाटचाल करत आहे. या भागात 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. या वेळी, अनेक प्रकारचे नियम व अटी लागू होतील, ज्याचे पालन करावे लागेल. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारकडून तिकिटांची जास्तीत जास्त किंमत ठरवली गेली, ज्यांचे पालन सर्व एअरलाइन्सला करावे लागेल. हरदीप पुरी यांनी सांगितले की, वंदे भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत 20 हजार भारतीयांना परत आणले गेले आहे. दरम्यान, काही देश लोकांना परत येऊ देत नाहीत, त्यामुळे समस्या निंर्माण झाली आहे. मंत्री म्हणाले की आता लोकांना परत आणण्याचा वेग वाढेल.
मेट्रो-नॉन मेट्रो सिटीसाठी वेगवेगळे नियम
स्थानिक उड्डाणांबाबत मंत्री म्हणाले की, मेट्रो टू मेट्रो शहरांमध्ये काही नियम असतील, मेट्रो टू मेट्रो नसलेल्या शहरांसाठी स्वतंत्र नियम असतील. मेट्रो शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यासारख्या शहरांचा समावेश असेल. केंद्रीय मंत्री म्हणाले की, सुरुवातीला विमानतळाचा एक तृतीयांश भाग सुरू होईल, कोणत्याही उड्डाणात अन्न दिले जाणार नाही. केवळ 33 टक्के विमानांना उड्डाण करण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर विमानातील मधली जागा रिकामी ठेवण्याबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की, मध्यवर्ती जागा रिक्त ठेवण्याचा आतापर्यंत कोणताही नियम नाही, परंतु इतर सर्व नियमांचे पालन विमानात केले जाईल.
सरकारने तिकिटाचे दर केले निश्चित
सरकारने तिकिटांच्या काही किंमती ऑगस्टपर्यंत निश्चित केल्या आहेत, उदाहरणार्थ दिल्ली ते मुंबई उड्डाणांसाठी किमान 3500 रुपये – जास्तीत जास्त 10,000 रुपये निश्चित केले गेले आहेत. त्याअंतर्गत कंपन्यांना किंमत निश्चित करावी लागेल. सर्व कंपन्यांना सुमारे चाळीस टक्के जागा जास्तीत जास्त-किमान किंमती दरम्यान द्याव्या लागतील. ही किंमत यंत्रणा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
आत्ताचा पहिला टप्पा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे, प्रत्येकाला आरोग्य सेतु अॅप ठेवावे लागेल. देशाचा मार्ग सात मार्गांमध्ये विभागला जाईल, त्यापैकी 30 मिनिटे, 40 मिनिटे, 60 मिनिटे, 90 मिनिटे, 120 मिनिटे, 150 मिनिटे, 180 मिनिटे आणि 210 मिनिटांत विभागण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. तसेच 25 मार्चपासून उड्डाण अंतर्गत 5 लाख किमी. हा प्रवास कव्हर केला गेला, यावेळी कोरोना विषाणूशी संबंधित सामग्री देशातील वेगवेगळ्या राज्यांतील भागांत देण्यात आली. वैद्यकीय वस्तू परदेशातूनही देशात आणल्या गेल्या आहेत.
40 per cent seats in flights would have to be sold at mid-point of lower and upper air fare limit set for the route: Aviation Secretary
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2020
बुधवारीच केंद्रीय मंत्र्यांनी देशांतर्गत उड्डाणे नियमानुसार सुरू करण्याची घोषणा केली होती. देशातील सर्व विमानतळांना 25 मे पासून उड्डाणे करण्यास सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
– प्रवाशांनी उड्डाण वेळेच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे.
– प्रत्येकाकडे आरोग्य सेतु अॅप असणे आवश्यक आहे.
– ज्यांच्या फ्लाईटला चार तास आहेत, केवळ त्यांना विमानतळावर प्रवेश मिळेल.
– प्रवाश्यांनी मास्क, ग्लोव्हस घालणे आवश्यक आहे. सामाजिक अंतराचे अनुसरण करणे देखील महत्वाचे आहे.
– या व्यतिरिक्त विमानतळ, विमान कामगारांनी पीपीई किट घालणे आवश्यक आहे.
– उड्डाणा दरम्यानही अनेक प्रकारची दक्षता घेण्यात येईल.
Domestic civil aviation operations will recommence in a calibrated manner from Monday 25th May 2020.
All airports & air carriers are being informed to be ready for operations from 25th May.
SOPs for passenger movement are also being separately issued by @MoCA_GoI.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) May 20, 2020