Hardik Pandya | टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याचे पंतबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला…
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Hardik Pandya | भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या अगोदर टीम इंडियाचा विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंत याचा अपघात झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यावेळी हार्दिक पंड्याने रिषभ पंतबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला हार्दिक पांड्या?
दिल्लीवरून घरी जाताना पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. रस्त्यावरील खड्डा चुकवताना पंतचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात घडला, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली आहे. सध्या रिषभ पंतच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. यासंदर्भात बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “आगामी होणाऱ्या विश्वचषकासाठी ऋषभ पंत (Rishabh Pant) खूप महत्वाचा भाग होता. भारतीय संघाच्या प्लॅनमध्ये त्याचा सहभाग होता. पण सर्वांना आताची परिस्थिती माहित आहे. खूप खेळाडू आहेत, ज्यांना संधी मिळू शकते. पण ऋषभ पंतचा सहभाग असता, तर त्याने क्रिकेटच्या मैदानात चमकदार कामगिरी केली असती. पण आता प्रतीक्षा करूया आणि भविष्यात काय घडतंय, ते पाहुया.” असे हार्दिक पांड्या म्हणाला.
या मालिकेमध्ये रिषभ पंतच्या जागी भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक डावखुरा फलंदाज इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
बांगलादेश विरुद्ध छट्टोग्राममध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात किशनने वादळी खेळी करून द्विशतक झळकावले होते.
हे द्विशतक झळकावताना त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला होता.
सध्या टीम इंडियाकडे पंतच्या जागेवर संजू सॅमसन आणि के एल राहुल दोघेही यष्टीरक्षक म्हणून पर्याय उपलब्ध आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव,
राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, ईशान किशन,
संजू सैमसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.
Web Title :- Hardik Pandya | team india captain hardik pandya big statement on rishabh pant skipper says pant would have made huge impact indian cricket team
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप