धक्कादायक! प्रेमी युगुलानं केलं हॉटेल बुक, शेवटच्या क्षणी केला एक फोन अन् होत्याचं नव्हतं झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हरियाणातील रेवाडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम करणाऱ्या एका युगुलाने एक हॉटेल बुक करून दोघांनी टोकाचं पाऊल उचलले आणि आपले आयुष्य संपवले. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलेलं आहे. आयुष्यभर प्रेम निभावता येणार नसल्याने दोघांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.

हे प्रेमीयुगुल एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांनी दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेतली होती. आणि यातूनच त्यांनी एक हॉटेल बुक केले आणि तेथे विष पिऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रियकराचे नाव कुलदीप असून त्याच लग्न झालं होतं. आणि त्या तरुणास १ लहान मुलगाही आहे. परंतु त्याच्या लग्नानंतर त्याचं एका तरुणीवर प्रेम जडलं. ती तरुणी अविवाहित असून त्या दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली होती. ते एकमेकांच्या प्रेमात खूप गुंतले होते आणि त्यातूनच ते दोघंही लग्न करून एकत्र सुखी संसाराची स्वप्न पाहात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा विवाहित असून मुलगी अविवाहित होती. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. आणि त्यामुळेच दोघांनी कुणालाही न सांगता गेल्या ३ महिन्यापासून घर सोडले होते. आणि अशातच तब्बल ३ महिन्याच्या कालावधीनंतर त्यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये सापडल्याची माहिती समोर आली.

त्या दोघांना समाजाने नाकारलं असतं या भीतीपोटी त्यांनी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास दोघांनी रेवाडी येथे हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. आणि तेथेच त्यांनी विष पिऊन आपले आयुष्य संपवले. त्या दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी आपापल्या घरी फोन करून चौकशी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली असून दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपासाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/