विलायचीचे 3 उपाय ठेवतील मधुमेहावर नियंत्रण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   छोटी हिरवी विलायची अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फायबर, अँटी-ऑक्सीडेट, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दररोज विलायचीचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांनी चहामध्ये विलायचीचा वापर करावा. विलायची साखर पातळी आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि दिवसभर ऊर्जावान ठेवते.

विलायचीचे काही फायदे..

१) विलायची आणि दुधाचा चहा

बर्‍याचदा लोक सकाळ- संध्याकाळ दुधाचा चहा पितात. यामध्ये विलायचीचे १-२ तुकडे, आल्याचा १ इंचाचा तुकडा टाकून हा चहा पिणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील थकवा आणि अशक्तपणापासून दूर करून ऊर्जा आणते. मधुमेह नियंत्रणाखाली आणून पाचन तंत्र मजबूत करते. पोटदुखी, बद्धकोष्ठता, पित्त इत्यादीपासूनही आराम मिळतो.

२) विलायची आणि लेमन- टी

खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आपले खूप वजन वाढते. लठ्ठपणामुळे मधुमेह आणि इतर आजार होतात. वेळीच त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी लिंबू असलेले लेमन-टी पितात. त्यामध्ये असलेले पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-व्हायरल गुणधर्म जलद वजन कमी करण्यास मदत करतात. परंतु बर्‍याच लोकांना लेमन-टीची चव आवडत नाही. त्यामुळे या मध्ये १-२ विलायची टाकून पिणे फायदेशीर ठरेल. हे आपल्याला आपली चव वाढविण्यासह वजन कमी करण्यास मदत करेल.

३) विलायची आणि ग्रीन टी

दररोज १-२ कप ग्रीन टी पिल्याने शरीर डिटॉक्स होते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासह वजन कमी करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत आपण १ विलायची टाकून ग्रीन टी घेतली तर त्याची चव वाढविण्यात आणि साखर पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

विलायचीच्या इतर फायद्यांविषयी..

१) जेवणानंतर १ विलायची खाल्ल्याने तोंडाचा वास दूर होतो. अन्न पचायला देखील मदत होते.व पाचक प्रणाली मजबूत होऊन पोटात दुखणे, गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होते.

२) विलायची चहा घेतल्यास खोकला सर्दी आणि हंगामी आजारांपासून आराम मिळतो.

३) विलायची मध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. याच्या सेवनाने तोंड आणि त्वचेच्या कर्करोगाच्या पेशीविरूद्ध लढा देण्यास सामर्थ्य मिळते.

४) दररोज विलायचीचे सेवन केल्यास फुफ्फुस निरोगी राहते. आपल्याला श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल.

५) मॅग्नेशियम आणि पोटॅशियमच्या योग्य स्त्रोतामुळे रक्त परिसंचरण सुधारते. तसेच, रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका कमी असतो.