‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रामुख्याने रताळं हे कंदमूळ बहुतांशी उपवासाच्या दिवसात खाल्ले जाते. १०० ग्रॅम रताळ्यामध्ये ४०० टक्क्यांपेक्षाही जास्त व्हिटॅमिन ए असते.

1) भूकेवर नियंत्रण राहते : रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते . फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. उपवासाच्या दिवसाव्यक्तिरिक्त ऐरवी रताळ्याचा आहारात समावेश करा.

2) रातांधळेपणा : रताळ्याच्या सेवनाने रातांधळेपणा कमी होतो.

3) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते : रताळ्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखरेची आणि त्यासोबतच रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

4) रोगप्रतिकारशक्ती वाढते : रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

5) हाडे मजबूत होतील : रताळ्याच्या सेवनाने हाडांना बळकटी मिळते.