Health Tips : 30 वर्षानंतर ‘या’ 5 गोष्टींपासून अंतर ठेवा, आरोग्यासाठी आहेत धोकादायक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ३० वर्षात आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. या वयात शरीर पूर्वीसारखे तंदुरुस्त राहत नाही. वयाच्या या टप्प्यावर, लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच हार्मोन्समधील देखील बरेच बदल होतात. ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वयाच्या ३० व्या वर्षी, आपण सर्व प्रकारचे अन्न खाण्यास सक्षम नसतो. पाचक शक्ती देखील प्रभावित होऊ लागते. या गोष्टीबाबत माहिती जाणून घ्या.. जे तुम्ही वयाच्या ३० वर्षानंतर खाऊ नये. चला त्या गोष्टींविषयी जाणून घ्या

१)मीठ – ३० वर्षानंतर आपण जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने त्वचा वृद्ध दिसू लागते आणि ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते.

२)साखर- वयाच्या ३० व्या वर्षी तुम्ही शक्य तितक्या कमी प्रमाणात साखर वापरली पाहिजे. वाढत्या वयानुसार व्यक्तीची झोपही कमी होऊ लागते. या वयात साखर जास्त प्रमाणात खाल्याने लठ्ठपणा वाढू लागतो.

३)कॅफिन- वृद्धत्वामुळे आपण कॅफिन असलेले पेय कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. कैफेनेटेड पेये आपली झोपेची गुणवत्ता खराब करतात आणि यामुळे झोपेच्या वेळी कार्य करणारे आपल्या त्वचेचे नुकसान भरुन काढू शकत नाहीत.

४) तळलेल्या गोष्टी – वाढत्या वयानंतर मानवी पचनसंस्था कमकुवत होऊ लागते. या वयात लोक फारसे सक्रिय नसतात. अशा परिस्थितीत तळलेले किंवा जंक पदार्थ पचविणे अवघड होते. त्याचा प्रभाव आपल्या केस, त्वचा आणि शरीराच्या सर्व भागात दिसू लागतो.

५) मैदा- मैद्यामध्ये साखर, कार्ब्स आणि फैट अधिक प्रमाणात असतात. या वयात पचनशक्ती कमी होऊ लागते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. व आपल्या आतड्यांसाठीही मैदा हानिकारक असतो.