अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावल्याने अनेक घरात पाणी शिरले. या पावसात महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था कोलमडली. अनेक घरांमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. अनेक दुकानांतही पाणी गेले आहे.
गेल्या अनेक दिवसानंतर नगर शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी दीड तास झालेल्या पावसाने नगरमध्ये हाहाकार उडवला आहे. नगर शहरातील गुलमोहर रोड भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. दुकानेही पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले चित्र पाहायला मिळाले. या परिस्थितीत महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था नेमकी कुठे गेली, हे समजायला तयार नाही.
मनपा आपत्ती व्यवस्थापनमधील एकही कर्मचारी या नागरिकांकडे फिरकला नाही. त्यामुळे नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. महानगरपालिकेकडून पाणी उपसणे बाबत कोणतीच मदत न भेटल्याने नागरिक हतबल झालेले दिसत होते. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
- वजन कमी करण्याचा ‘गोड’ उपाय ! एकदा करून बघाच
- नारळ ‘इतक्या’ आजारांसाठी उपयुक्त, जाणून घ्या
- ‘सेक्स लाईफ’ सोबत अनेक आजारांवर कांदा उपयुक्त, जाणून घ्या
- ‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा
- रोज भिजवलेले मनुके खाण्याचे ५ फायदे ; जाणून घ्या
- महिलांनी ‘या’ खास दिवसांमध्ये खाऊ नये पपई, कारण जाणून घ्या
- चेहरा होतो उजळ, दररोज ‘हे’ केल्याने होतात मोठे फायदे
- पावसाळ्यात फूड पॉयझनिंग झाल्यास करा ‘हे’ रामबाण घरगुती उपाय
- कमी झोप घेतल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या
- वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ‘या’ १३ खास टीप्स