जेव्हा दारूच्या नशेत थेट चेन्नईला जाऊन धर्मेंद्रनं थांबवलं होतं हेमा मालिनी आणि जितेंद्रचं लग्न ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. धर्मेंद्र यांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्या दर्जेदार अभिनयाबाबत आजही बोललं जातं. बंदिनी या सिनेमातून धर्मेंद्र प्रकाशझोतात आले होते. आज आपण धर्मेंद्र, जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचा एक जुना किस्सा जाणून घेणार आहोत जो खूप कमी लोकांना माहिती आहे. एक वेळी अशी होती जेव्हा हेमा आणि जितेंद्र यांचं लग्न होणार होतं. परंतु धर्मेंद्र यांनी खूप राडा घालून हे लग्न थांबवलं होतं.

हेमा मालिनी यांच्या बियॉंड ड्रीमगर्ल या आत्मवृत्तात लिहिल्याप्रमाणं धर्मेंद्र आणि हेमा यांचं प्रेम प्रकरण हेमाची आई जया चक्रवर्ती यांना पसंत नव्हतं. कारण धर्मेंद्र विवाहित होते आणि त्यांना 3 मुलंही होती. दोघांना करण्यासाठी आई जया यांनी जितेंद्र सोबत हेमाचं लग्न लावण्याचा विचार केला.

हेमाच्या आईनं हेमाचं मन वळवलं आणि जितेंद्रच्या आईवडिलांना भेटायला सांगितलं. ते या लग्नासाठी तयार होते. आईसाठी हेमा लग्नाला तयार झाल्या.

गुपचूप लग्न लावण्यासाठी घरचे सगळे चेन्नईला पोहोचले. लग्नाची बातमी गुप्त ठेवूनही लीक झाली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आली. बातमी पाहून धर्मेंद्रचा पारा चढला आणि ते शोभा सिप्पी (जितेंद्रची बालमैत्रीण) यांना घेऊन फ्लाईटनं चेन्नईला गेले.

कसंतरी करून धर्मेंद्र हेमाला एकांतात भेटले आणि त्यांना हे लग्न न करण्यासाठी सांगितलं. हेमाचे वडिल खूप चिडले होते. परंतु दारूच्या नशेत असणारे धर्मेंद्र कोणाचंच ऐकेना. गोंधळलेल्या हेमा यांनी लग्न पुढे ढकलण्यास सांगितलं. जितेंद्र आणि त्यांच्या घरचे खूप संतापले होते. यानंत जितेंद्र कुटंबाला घेऊन तिथून निघून गेले.

यानंतर 18 ऑक्टोबर 1974 रोजी शोभा सिप्पी यांच्यासोबत जितेंद्र विवाहबद्ध झाले. त्यांना दोन मुलं आहे. एक म्हणजे टीव्हीची क्वीन एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूर.