Hindu Janakrosh Morcha | ‘…सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं ! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे गटावर सडकून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज दि.२९ मुंबईत निघालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चावर (Hindu Janakrosh Morcha) शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. त्यावर आता आक्रमक पवित्रा घेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. (Hindu Janakrosh Morcha)

 

मुंबईमध्ये, आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लव्ह जिहाद (Love Jihad), धर्मांतरण आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा. अशी मागणी या मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘देशात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन शक्तिमान नेत्यांचं राज्य आहे. महाराष्ट्रात सुद्धा हिंदूंचं राज्य आलं, असं सांगण्यात येत आहे. तरीही काढलेला आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण, हिंदू समजले जाणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. म्हणून आक्रोश मोर्चा निघाला असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे.’ असा खोचक टोला यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला (BJP) लगावला होता.

संजय राऊत यांना प्रतिउत्तर देताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये एक ट्वीट केले. त्यात ते म्हणाले की, ‘पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल आज. सळसळत्या हिंदुत्वाचं हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही, कारण उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आणि आजच मुस्लिमांची परिषद घेणाऱ्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या दारात नेऊन ठेवलं. बाकी हिंदू समर्थ आहे.’ असा टीका त्यांनी आपल्या ट्वीच्या माध्यमातून ठाकरे गटावर केली आहे. (Hindu Janakrosh Morcha)

 

दरम्यान, मोर्चावर भाष्य करणारे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील केले होते.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले.
आठ वर्षांपासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे? काश्मिरात पंडितांचा आक्रोश.
करसेवकांच्या हत्या करणाऱ्या मौ. मुलायम यांना पद्मविभूषण हिंदू आक्रोश करणारच!’ अशा शेलक्या शब्दात
संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच ट्वीटला केशव उपाध्ये यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

 

हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन आज दि.२९ मुंबईत करण्यात आले होते.
लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी दादर (प) येथील मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली.
कामगार मैदान, प्रभादेवी येथे या मोर्चाचा समारोप होणार आहे. यात विविध हिंदू संघटनेचे नेते सामिल झाले.
मात्र, शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) या मोर्चात सहभागी होणे टाळले.
त्यावरून भाजपकडून ठाकरे गटावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

 

Web Title :- Hindu Janakrosh Morcha | keshav upadhye responded to sanjay raut criticism of bjp over hindu jan awach morcha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण