हिंदू राजा असताना काश्मीर सुरक्षित होते : योगी आदित्यनाथ

लखनऊ : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये हिंदू राजा होता तोपर्यंत तेथील हिंदू आणि शिख बांधव सुरक्षित होते. परंतु, हिंदू राजा गेल्यानंतर तेथे हिंदूंचाही ऱ्हास झाला. आज काश्मीरमध्ये काय स्थिती आहे दिसतच आहे. या इतिहासावरून आपल्याला योग्य तो धडा घेतलाच पाहिजे, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. लखनऊ येथील विश्वैश्वरया ऑडिटोरियममधील  एका शिख बांधवांच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.

योगी म्हणाले, तेज बहाद्दुर यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आणि काश्मीरचे रक्षण केले. त्यांनी देशासाठी आणि धर्मासाठी चार मुलांचाही त्याग केला होता. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. इम्तियाज अहमद मीर या अधिकाऱ्याची हत्या कशी केली. हिंदू राजा होता तोपर्यंत काश्मीर हिंदू आणि शिख बांधवांसाठी सुरक्षित होते आता मात्र ते कोणासाठीच सुरक्षित राहिलेले नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. एकुणच पुन्हा काश्मीरमध्ये हिंदू राजाचे राज्य यावे, असे मत योगी यांनी व्यक्त केले आहे.