‘ज्या दिवशी भारतीय मुस्लीम अरब देशाकडे तक्रारी करतील ‘त्या’ दिवशी ‘त्सुनामी’ येईल’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जफरुल इस्लाम यांनी लिहिलं आहे की, ज्या दिवशी मुस्लिम अरब देशाकडे तक्रारी करतील त्या दिवशी त्सुनामी येईल असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. इस्लाम देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप भाजपने केला आहे.
Thank you #Kuwait for standing with #IndianMuslims! #Islamophobia #Islamophobia_In_India @kuna_en @kuwaittimesnews @OIC_OCI @Abdulmane@ZahraniAbidi @LadyVelvet_HFQ @DrAlshoreka @AHMAD_ALWAHIDAH @majedalenzi @JamalBahrain@arabtimeskuwait @gulf_news @arabnews pic.twitter.com/MdOOBviNdU
— Zafarul-Islam Khan (@khan_zafarul) April 28, 2020
जफरुल इस्लाम खान यांनी याबाबत फेसबुक पोस्टमध्ये लिहलं आहे की, ज्या दिवशी भारतातील मुस्लिम अरब आणि अन्य मुस्लिम देशांकडे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करतील, त्यादिवशी त्सुनामी येईल. धन्यवाद कुवैत, भारतीय मुस्लिमांच्या मदतीसाठी उभे राहिल्याबद्दल, कट्टर हिंदुत्ववादी लोकांना वाटतं की, अरब आणि अन्य मुस्लिम देश आपल्या आर्थिक हितसंबंधामुळे भारतातील मुस्लिमांवरती अत्याचाराची चिंता करणार नाहीत.
घटिया और जहरीली सोच वाले @khan_zafarul को तुरन्त पद से हटाइये
आतंकी जाकिर नाइक का समर्थन कर रहा है
देश के अंदर हमलों की बात कर रहा हैंऐसे आतंकी सोच वाले को AAP ने दिल्ली अल्पसंख्यक आयोग का मुखिया बना रखा है
हमारी मांग और चेतावनी – इसे तुरंत हटाइये pic.twitter.com/9snwBYPCDz
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) April 29, 2020
भारतातील मुस्लिमांची अरब आणि इतर अन्य मुस्लिम देशात प्रचंड लोकप्रियता आहे. हे कदाचित हे विसरले असतील. भारतीय मुस्लिमांनी अनेक वर्षापासून सद्भावनेने इस्लामची सेवा केली आहे. इस्लामचा उल्लेखनीय अभ्यासकांमध्ये त्यांचा नेहमीच समावेश आहे, ज्यांनी जागतिक वारसा म्हणून त्यांचे सांस्कृतिक योगदान दिले आहे. शाह वलीउल्लाह देहलवी, इक्बाल, अबुल हसन नदवी, वहीदुद्दीन खान, झाकीर नाईक यांची नावे अरब आणि मुस्लिम देशातील प्रत्येक घरात मोठ्या सन्मानाने घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जफरुल इस्लाम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये इशारा देताना म्हटले आहे की, या कट्टरपंथीयांनी हे जाणून घ्यांव की, भारतीय मुस्लिमांनी आतापर्यंत द्वेष मोहीम, लिंचिंग आणि दंगलीची कोणतीही तक्रार अरब आणि इतर मुस्लिम जगाकडे केली नाही. ज्या दिवशी त्यांना असं करण्यास भाग पाडले जाईल त्या दिवशी कट्टरतावाद्यांना वादळचा सामना करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांच्या या पोस्टवर दिल्लीचे नेते कपिल मिश्रा म्हणाले की, कठोर आणि विषारी विचार असणाऱ्या जफरुल इस्लाम यांनी त्वरित पदावरून दूर करा. झाकीर नाईकला त्यांचे समर्थन आहे. देशाच्या आत हल्ल्यांविषयी बोलत आहेत. देशाच्या आत हल्ल्यांविषयी बोलत आहेत. अशा द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींचं आप ने दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुखपद कायम ठेवले आहे. त्यांना त्वरीत या पदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे.