अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून आज शहरातून हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या भव्य मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषद, भाजप, शिवसेना आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गांधी मैदान येथून सुरुवात झालेला हा मोर्चा चितळे रोड, चौपाटी कारंजा, जुने कोर्ट गल्ली, वाडिया पार्क, बस स्थानक, पुना रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ समारोप करण्यात आला. या वेळी सहभगी झालेले नागरिक भारत माता कि जय…, वुई सपोर्ट सी.ए.ए., अशा जोरदार घोषणा देत होते. शेकोडो नागरिकांनी तिरंगा ध्वज व घोषवाक्याचे फलक हातात घेतले होते. शांतेत व शिस्तीत हा मोर्चा मार्गस्थ झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ या मोर्चाचे सभेतर रुपांतर झाले.
यावेळी माजी आमदार अनिल राठोड म्हणाले, स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतर भारतात प्रथमच अत्यंत मोठे निर्णय घेतले जात आहे. काश्मीर प्रश्न, राम मंदिर व आता या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अमलबजावणी होत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आता या कायद्यामुळे पूर्ण होणार आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या कायद्याचे समर्थन करावे व देश विघातक शक्तींना विरोध करावा.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर आत्ता पर्यंत कोणीही घेतले नसतील असे धाडसी निणर्य घेत आहेत. मात्र विरोधकांना हे सहन होत नाहीये, त्यांचा जळ पापड झाला आहे. त्यामुळेच देशात अशांतता पसरवत दंगल घडून आणत आहेत. खा. सुजय विखे म्हणाले, भारतीय नागरिक या कायद्याचे समर्थन करत आहेत. जे हिंसा करत दंगल घडून आणत आहेत ते खरे भारतीय नाहीत. ते घूसखोर आहेत.
रा.स्व.संघाचे प्रांत संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे म्हणाले, महात्मा गांधी यांनी देशास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच या कायद्याची मागणी केली होती. तसेच 2003 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कडे या कायद्याची मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची अमलबजावणी सुरु केली असल्याने देशात परिवर्तनाची नांदी झाली आहे.
उपमहापौर मालन ढोणे, काँग्रेसचे धनंजय जाधव, चंद्रकांत काळोखे यांनीही या कायद्याच्या समर्थनार्थ भाषणे केली. सभेचे सुत्रसंचलन सचीन रारुत यांनी केले, आभार रुद्रेश आंबाडे यांनी मानले. यावेळी रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर, शांतीभाई चंदे, माजी खासदार दिलीप गांधी, वसंत लोढा, भाजप जिल्हध्यक्ष भानुदास बेरड, सुवेंद्र गांधी आदींसह भाजप, सेनाचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ ५ वनस्पती जवळपास ठेवल्या तर डास जातील पळून !
- ‘या’ ७ उपायांनी मासिक पाळीच्या वेदना होतील दूर !
- ‘सोशल मीडिया’वर सतत ‘अॅक्टिव्ह’ राहण्याचे ‘हे’ आहेत ३ दुष्परिणाम
- उपाशीपोटी ‘हे’ ७ पदार्थ चुकूनही खाऊ नका, जाणून घ्या परिणाम
- ‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक !
- ‘हे’ आहेत चॉकलेटचे ८ आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या
- सकाळी चालायला जाता, मग ‘ब्रिस्कवॉक’ घ्या, ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
- मुळ्याचे ‘हे’ १५ आरोग्यवर्धक फायदे माहिती आहेत का ? जाणून घ्या
- पायावर उभे राहूनही काम करायला शिका, ‘हे’ आहेत ४ फायदे
- ‘हे’ तेल हृदयासाठी ‘टॉनिक’, 9 प्रकारच्या आजारांपासून ठेवतं दूर, जाणून घ्या
- उत्तम आरोग्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ नियमित खा, जाणून घ्या कोणते