पोट निवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपाला विकले गेले : हितेंद्र ठाकूर

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर पोट निवडणुकीत आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली. असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या २३ एप्रिलला होणार आहे. याचदरम्यान, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याच मित्र पक्षांवर खळबळजनक आरोप केला आहे. आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली. असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, मित्रपक्षांच्या नेत्यांकडे बोट दाखवत विकले होतात की नाही? असा सवालही त्यांनी केला.

याचबरोबर, लायकी जास्त होती तर मतं का कमी पडली ? असा सवाल करत त्यांनी मित्र पक्षांची मतांची लायकीही काढली. आम्हीही त्यावेळी चोर होतो. आमचा अध्यक्ष देखील त्यामध्ये होता. मात्र आता आपण एकत्रित आहो. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मित्र पक्षांवर निशाणा साधत त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इकडे येऊन म्हणतात की आम्ही गुंड आहोत, बाळासाहेब म्हणायचे गुंड चालेल पण षंड नको. मग मी गुंड आहे. असेही त्यांनी म्हंटले.