कलम 370 ! काश्मीरबाबत ‘अफवा’ पसरवणारे 8 ट्विटर ‘हँडल’ बॅन करण्याची शिफारस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणे आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खाती बंद करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने @kashmir787-Voice of Kashmir, @Red4Kashmir-MadihaShakil Khan, @arsched-Arshad Sharif, @mscully94-Mary Scully, @sageelaniii-Syed Ali Geelani, @sadaf2k19, @RiazKha61370907 आणि RiazKha723 या खात्यांचा समावेश आहे.
जम्मू काश्मीरमधून काही दिवसांपूर्वीच कलम ३७० हटवण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावर या संदर्भात व्हायरल होणाऱ्या मसेजेसकडे सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. जेणेकरून काश्मीर मधील वातावरण शांत राहील. तसेच जम्मू काश्मीरमध्ये काही संघटना दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं जैश-ए-मोहम्मदला हिरवा कंदील दाखवला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतीय भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी रजौरी किंवा पुँछमध्ये लपले असावेत अशी शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. हे दहशतवादी अनंतनाग महामार्ग आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले घडवू शकतात. तसेच नागरी वस्त्या आणि सरक्षा दलांची कार्यालयेही लक्ष केली जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
- ‘या’ भाजीमध्ये आहेत सर्वात कमी फॅट, ‘कोलेस्टेरॉल’ राहते नियंत्रणात
- तुम्ही उभे राहून पाणी पिता का ? मग तुमच्यासाठीच आहेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
- ‘या’ ५ देशांच्या महिला का दिसतात अधिक सुंदर ? हे आहे त्यांच्या सौंदर्याचे गुपित !
- तुम्हाला झोपेत बडबडण्याची सवय आहे का ? जाणून घ्या या सवयीमागील कारणे
- पेरुच्या पानांचे ‘हे’ उपाय करा, केसांच्या सर्व समस्यांपासून होईल तात्काळ सुटका
- ‘हे’ औषध घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या १० महत्त्वाच्या गोष्टी, अशी घ्या काळजी
- जमीनीवर झोपण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, गादीवर झोपणे तुम्ही सोडून द्याल
- फेसपॅक लावताना अजिबात करु नका ‘या’ ४ चुका, होईल दुप्पट फायदा
- ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे