फडणवीस सरकरचा निर्णय बदलला, घरबांधणीचा परवाना ग्रामपंचायतीकडे : राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिंधुदुर्ग : पोलिसनामा ऑनलाईन – ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना केराची टोपली दाखवली आहे. त्यापैकीच आणखी एका निर्णयात बदल करण्यात आला असून आता ग्रामपंचायतीला घरबांधणीचा परवाना देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्द्दुल सत्तार यांनी याबाबत घोषणा केली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात गावात घर बांधायचे असेल तर केवळ ग्रामपंचायत नव्हे तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावरील नगररचना अधिकाऱ्याची परवानगी बंधनकारक करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र ठाकरे सरकारने हा निर्णय गुंडाळला आहे. आता घर बांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला दिले आहेत. फडणवीस सरकारच्या या निर्णयाला त्यावेळी लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला होता.