मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा ‘पुरता कार्यक्रम’ करण्याचे संकेत देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा. या विधानावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टोला लगावला आहे. यावेळी आव्हाड पत्रकार परिषदेत बोट होते.
पत्रकारांनी पंढरपूर पोटनिवडणूक आणि राज्यातील कोविडच्या संदर्भात काही प्रश्न विचारले असता त्यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणले, फडणवीसांनी वापरलेला तो शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द खरा कोणाचा आहे, ते संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहीत आहे. असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच सत्ताबदलाविषयी फडणवीस पूर्वीपासून बोलत आहेत. त्यामुळं त्यांनी काल काही म्हटलं असेल तर मला त्यात नवल वाटत नाही,’ असं बोलून आव्हाड यांनी अधिक बोलणं टाळलं आहे.
या दरम्यान, जितेंद्र आव्हाड हे मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर १ हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमाशी सवांद साधला.