Banking Fraud : 10 दिवसात मिळतील बँक अकाऊंटमधून ‘गायब’ झालेली संपूर्ण रक्कम; फक्त तुम्हाला करावे लागेल RBI ने सांगितलेले ‘हे’ काम
नवी दिल्ली : सध्या डिजिटल युग आहे. चहा पिण्यापासून शॉपिंग आणि कार खरेदी करण्यापर्यंत पेमेंट करण्यासाठी आपण डिजिटल पद्धत अवलंबतो. युपीआय पेमेंट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट, ऑनलाइन बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अॅप कॅश व्यवहारापेक्षा जास्त पेमेंटच्या या पद्धती वापरात आहेत. या डिजिटल व्यवहाराच्या युगात सायबर फ्रॉडच्या घटना सुद्धा वाढत चालल्या आहेत.
आरबीआयने सांगितले – काय करावे लागेल
भारतीय रिझर्व्ह बँकेने तुमच्या खात्यातून गायब होणारे पैसे पुन्हा मिळवण्याची पद्धत सांगितली आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की, जर एखादा अनधिकृत व्यवहार होत असेल तर त्यानंतर सुद्धा तुमचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतात. मात्र, यासाठी सावधगिरी आवश्यक आहे. आरबीआय म्हणते की, अशा कोणत्याही चुकीच्या ट्रांजक्शनची माहिती ताबडतोब बँकेला देऊन तुम्ही नुकसान टाळू शकता.
रिझर्व्ह बँकेनुसार, जर अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहाराने तुमचे नुकसान झाले असेल आणि तुम्ही बँकेला ताबडतोब कळवले, तर तुमची देयता मर्यादित होऊ शकते, किंवा शून्य सुद्धा होऊ शकते. म्हणजे वेळीच बँकेला अशा प्रकाराची माहिती देणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमचे सर्व पैसे मिळू शकतात.
अखेर कसे परत मिळणार पैसे?
बँकांकडून अशा सायबर फ्रॉडच्या धोक्यापासून वाचण्यासाठी इन्श्युरन्स पॉलिसी घेतली जाते. अशावेळी बँक तुमच्यासोबत झालेल्या फ्रॉडची सर्व माहिती थेट इन्श्युरन्स कंपनीला सांगेल आणि तेथून इनश्युरन्सचे पैसे घेऊन तुमच्या नुकसानीची भरपाई करेल. अशा सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी इन्श्युरन्स कंपन्या लोकांना थेट कव्हरेज सुद्धा देत आहेत.
3 दिवसात करा तक्रार
जर तुम्ही बँकिंग फ्रॉडला बळी पडलेत तर तुम्हाला 3 दिवसांच्या आत याबाबत बँकेकडे तक्रार करावी लागेल. तरच तुमचे नुकसान होणार नाही. आरबीआयने म्हटले आहे की, निर्धारित वेळेत बँकेला माहिती दिल्यास ग्राहकाच्या खात्यातून फसवणुक करून काढलेली रक्कम 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यात परत येईल. जर बँक खात्यात झालेल्या फसवणुकीचा रिपोर्ट 4 ते 7 दिवसांनतर दिला गेला तर ग्राहकाला 25,000 रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागेल.