बारावीचा निकाल ८८. ४१ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला.राज्याचा निकाल यंदा 88.41 टक्के लागला आहे. बर्याच वर्षांपासून चाललेल्या परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.36 टक्के मुले पास झाली आहेत.

विद्यार्थ्यांना निकाल आज दुपारी 1 वा बोर्डाच्या www.mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. यावर्षी राज्यात 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विद्यार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यर्थिनी होत्या.

कोकण बिभागाची बाजी

यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 94.85 टक्के निकाल इतका लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा निकाल 86.13 टक्के इतका लागला आहे.विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत येत्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल.

संबंधित घडामोडी:

बारावीचा ऑनलाईन निकाल पहा या संकेतस्थळावर

एकूण निकाल – टक्के

मुलांची टक्केवारी- 85.36टक्के

मुलींची टक्केवारी -92.36 टक्के
कला – ७८. ९३ टक्के

विज्ञान- ९५. ८५टक्के

वाणिज्य-८९. ५० टक्के

व्यावसायिक अभ्यासक्रम-८२.१८ टक्के

विभागवार निकाल –

पुणे: 89.58
नागपूर : 87.57
औरंगाबाद: 88.74
मुंबई: 87.44
कोल्हापूर: 91.00
अमरावती: 88.08
नाशिक: 86. 13
लातूर: 88.31
कोकण : 94.85
नाशिक-86. 13 टक्के

बोर्डाने 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.knowyourresult.com

www.hscresult.mkcl.org

आज वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल.

बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागात बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मोबाईलवर निकाल कसा मिळवाल? एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल. MHHSC <space> <seat no> हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विद्यार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यर्थिनी होत्या. विद्यार्थ्यांची शाखानिहाय आकडेवारी याप्रमाणे-

विज्ञान शाखा- 5 ,लाख 80 हजार 820 विद्यार्थी
कला- 4 लाख 79 हजार 863 विद्यार्थी
वाणिज्य- 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी
व्यावसायिक अभ्यासक्रम- 57 हजार 693 विद्यार्थी