पत्नीने शहर सोडण्यास नकार दिल्याने पतीने केली हत्या
Share
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजच्या जमान्यात पती-पत्नीमधील किरकोळ वादातून मोठ्य घटना घडताना दिसत आहेत. मात्र, पत्नीने शहर सोडण्यास नकार दिल्याने चारित्र्याचा संशय घेऊन रागाच्या भरात पतीने तिची थेट हत्या केल्याचा प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7a5bc71-ca18-11e8-81a4-7572114b8a4a’]
महत्वाचे म्हणजे दोघांनी २०१३ मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघेही आझमगडचे राहणारे होते. मात्र, लग्नानंतर ते दिल्लीतील नजफगड भागात राहत होते. महिला त्यावेळी अल्पवयीन होती. यामुळे पतीविरोधात उत्तर प्रदेशमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. नंतर २०१७ मध्ये न्यायालयाने मुलीच्या सांगण्यावरून खटला रद्द केला होता.
२ आॅक्टोबरला पोलिसांना या महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली. मात्र तिचा पती आफताब अहमद फरार झाला होता. आदल्या रात्री दोघेही एकत्रच होते. त्यांचा ४ वर्षांचा मुलगा आझमगड येथे राहतो. अफताबच्या मोबाईलची लोकेशन कधी सहारनपूर तर कधी लखनौ येत होती. यानुसार पोलिसांनी त्याला काकीच्या घरातून अटक केली.
त्याने दिलेल्या माहितीनुसार पत्नीसोबत दिल्ली सोडून आझमगडला राहण्यास जाण्यासाठी बऱ्याचदा भांडणे होत होती. त्याला आझमगढला राहायचे होते. मात्र, पत्नीचा त्याला विरोध होता. यामुळे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. २ आॅक्टोबरलाही याच गोष्टीवरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आफताबने घरातील चाकूने तिचा गळा कापला. तसेच तिचा गळा ओढणीने दाबून खुन केला व तो पळून गेला होता.