धक्कादायक ! ‘पप्पांनी आईला मारून टाकलं’, 14 वर्षाच्या मुलीनं सांगितलं

 पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. गुरुग्रामच्या गढी हरसरू गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पतीला पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती. या संशयामुळे दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने सिटबेल्टने पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने सुसाईट नोट लिहून आत्महत्या केली. या घटनेपूर्वी आरोपी पतीने 14 वर्षाच्या मुलीला खोलीत बंद केले होते. शुक्रवारी सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला.

शुक्रवारी संध्याकाळी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची पथक गढी हरसरू गावात पोहोचली. मृत जोडप्याच्या 14 वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितले की वडील प्रमोद कुमार (वय 32) मूळचे चित्तौडगड, राजस्थान येथील रहिवासी आहेत. ते इलेक्ट्रिशियन होते. मागील अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने तिचे वडील घरी होते. वडील आईच्या चारित्र्यावर शंका घेत असत. या प्रकरणावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडण होत होती. ’शुक्रवारी दुपारी आई आणि वडिलांमध्ये भांडण झाले. वडिलांनी मला खोलीत बंद केले व बाहेरून कुलूप लावले. यानंतर आईच्या डोक्याला बाहेर पडलेल्या सिटबेल्टने जोरदार जखम केली आणि ती जखमी अवस्थेत खाली पडली. यानंतर वडिलांनी बाथरूममध्ये जाऊन आत्महत्या केली.