जेलमधील मित्र म्हणाले तुझ्या बायकोचं बाहेर ‘लफडं’, बहाद्दरांनं जामीन घेऊन पत्नीलाच ‘संपवलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई मधील वडाळा येथे एका कैद्याने कोर्टातून जामीन घेऊन पत्नीची चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याची धक्कादयक घटना घडली आहे. पत्नी ब्लॅकमेल करते म्हणून तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

चोरीच्या एका गुन्ह्यात नसीम जेलमध्ये होता. त्यावेळेस त्याला त्याची पत्नी यास्मिन बानो भेटायला येत नव्हती. त्यावेळी इतर कैदी हे नासिमला तुझ्या पत्नीचे बाहेर कुणाशी तरी संबंध आहे असे त्याला चिडवत असत. मित्राच्या बोलण्यावरून नसीमने आपली पत्नी यास्मिन बानोच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केली. जामीन घेतल्यानंतर थेट आपल्या घरी जाऊन त्याने मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. नसीमवर संशयाचे भूत इतके चढले होते की, त्याने पत्नीचे डोके बाथरूममधील भींतीवर जोरात आदळले. भीतींवर डोकं आपटल्यामुळे पत्नीने जीव सोडला.

शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर घटनास्थळी पोहचले, पत्नीनीची हत्या केल्यानंतर नसीम हा पळून गेला होता. त्यानंतर पोलिसानी ४ पथकं तयार करून तपास सुरु केला, त्यावेळी भायखळा रेल्वे स्थानकावर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नसीमच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी नसीमविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रेम, ब्रेकअप आणि हत्या

दुसऱ्या एका घटनेत पवईमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याचं 8 महिन्यानंतर उघड झालंय. दीपाली यादव या तरुणीने त्याचा मित्र नासिरशी लग्न केलं. काहीकाळ ते एकत्र राहिले मात्र लगेच त्यांचा ब्रेकअप झाला म्हणून दीपाली आईवडिलांसोबत राहू लागली. अचानक २७ जुलै २०१९ रोजी दीपाली बेपत्ता झाली. तिचा काही पत्ता लागत नव्हता, पोलिसांना नासिरशी दिपालीचा ब्रेकअप झाल्याचा घरच्यांनी सांगितलं नव्हतं.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नासिरचे फोन रेकॉर्ड तपासले असता दिपाली यादव बेपत्ता होण्याच्या काही तास आधी नासीर आणि दिपालीचं फोनवर बोलणं झालं होतं. त्यानंतर लगेच नासिरला पोलिसानी ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने काहीही उत्तर हि दिली नाहीत, पण नंतर पोलिसांनी नासीरला खाक्या दाखवताच त्याने दिपालीची हत्या केल्याचं कबूल केलं.

नासीरने आपला ड्रायव्हर मित्र ललनला हाताशी घेऊन आठ महिन्यापूर्वी दिपालीची हत्या केली होती. त्यानंतर दिपालीचा मृतदेह खाडीत फेकून दिला असे सांगितले. नासिरला दीपालीही ब्लॅकमेल करत होती. त्यालाच कंटाळून तिची हत्या केल्याचं नासीरने सांगितल्याचं पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितलं.

पोलिसांनी दोन्ही घटनांमधील पती आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. मात्र, मुंबईत या पत्नी हत्या कांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.