धक्कादायक ! पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या काही तासात पतीने घेतला गळफास, 4 महिन्यापूर्वीच झाला होता विवाह

जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या दाम्पत्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीने गळफास घेतल्याचे समजताच काही वेळाने पतीने देखील गळफास लावून आत्महत्या केली आहे. जामखेड शहरात बुधवारी (दि. 12) दुपारी ही धक्कादायक घटना घडली.  पती-पत्नीने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. या घटमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिल्पा अजय जाधव (वय 28) आणि अजय कचरदास जाधव (वय 32, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर)  अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. दरम्यान अजयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलीसांच्या हाती लागली आहे. त्यात  माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार असून इतर कोणासही दोषी ठरवू नये, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.

जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय व शिल्पा या दोघांचा 4  महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटात विवाह सोहळा झाला होता. शिल्पाने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती तिचा पती अजयला समजली. त्यानंतर अजयनेही  काही वेळातच  मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.  दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली आहे. जामखेड पोलीस घटनेचा तपास करत आहेत.