जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांनी केला सामूहिक बलात्कार

रांची : झारखंडच्या दुमका जिल्ह्यात मुफस्सिल ठाणे परिक्षेत्रात जत्रेतून पतीसमवेत परतणाऱ्या एका विवाहितेवर १७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. हि घटना मंगळवारी (दि ८) रात्री घडली. संताप परगना क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडल यांन यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे.

गावात मंगळवारी आठवडी बाजार भरतो, त्यामुळे पती-पत्नी खरेदीसाठी गेले होते. त्यानंतर, खरेदी करुन रात्री ८ वाजण्याच्या सुमारात दोघेही घरी परत येत असताना, वाटेत जवळपास १७ तरुणांनी त्यांना अडवले, हे तरुण दारुच्या नशेत धुंद होते. त्यापैकी ५ तरुणांनी मला पकडले आणि इतरांनी माझ्या पत्नीला शेजारी झाडीत नेऊन तिच्यावर दुष्कर्म केल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले. पीडितेला पाच मुले असून या घटनेमुळे पीडितेची प्रकृती बिघडली होती. बुधवारी या घटनेचा उलगडा झाला. पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी डीआयजींसोबत मुफस्सिल ठाण्यात पोहोचवून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, पीडित महिलेच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याच बरोबर आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही लकडा यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच जणांना अटक केली आहे.