हरलोय मी..आता जगू शकत नाही..मला माफ करा, औरंगाबादेत बेरोजगार तरुणाची आत्‍महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन-

मला माफ करा, मी सोडून चाललोय सर्वांना..मला माफ करा..खूप त्रास होतोय..हरलोय मी.. आता जगू शकत नाही..मी मेल्यावर माझी किडनी दान करा.. अशा आशयाचा काळीज पिळवटून टाकणारा संदेश मोबाईलवर लिहून एका बेरोजगार तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. अमोल अशोक  मिसाळ (वय-23, रा.अंबरहिल परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2c91692-81d0-11e8-83f3-a15fbdabfa96′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत अमोल हा एका ठिकाणी नोकरी करत होता. 15 दिवसापूर्वीच त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. तसेच इतर ठिकाणी देखील त्याला काम मिळत नव्हते. त्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. यामधून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केली. अमोल याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवरुन कुटुंबीयांना संदेश पाठवला आहे. यामध्ये मी हरलोय, त्यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये. तसेच माझ्या देहाचे दान करावे. काळजी घ्या, असे लिहलं आहे.

अमोलच्या या हृदय पिळवटून टाकणार्‍या संदेशामुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. तसेच २३ वर्षीय अमोल बेरोजगारीचा बळी ठरल्याने लोकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.