होय, मीच वगळलं नाईक निंबाळकरांच्या समर्थकांना, काय ‘प्रॉब्लेम’ आहे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या आरोपाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. त्या सवाल केली की मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय समस्या आहे.

सध्या पुण्यात कालवा समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला अजित पवार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत माढ्याचे खासदार असलेल्या नाईक निंबाळकर यांनी आरोप लावला की पाटलांनी माझ्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले. कालवा समितीतून एकूण चार लोकांना वगळण्यात आले असून त्यात आमदार जयकुमार गोरे, श्रीकांत देशमुख, विश्वास भोसले, माजी सनदी अधिकारी उत्तमराव जानकर यांचा समावेश आहे. जयकुमार गोरे यांनी आरोप लावला की नीरा डाव्या कालव्याच्या निर्णयामुळे आम्हाला वगळण्यात आले. बारामतीशी इमान राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हणले आहे. यावर पाटील यांनी उत्तर देताना त्यामागचे कारण स्पष्ट केले.

ते म्हणाले की, त्यात प्रॉब्लेम आहे. त्यांची उपयोगिता दिसली नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे. त्यांना माझ्या सांगण्यावरुन वगळले. निंबाळकर यांच्या आग्रहावरुन बारामती मतदारसंघात जाणारे नीरा देवघर प्रकल्पाच चाळीस टक्के पाणी माढ्यात वळवण्यात आल्याचे मानले जाते. हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. बारामतीकरांना पाणी पळवल्यावरुन निंबाळकर यांनी अनेकदा लक्ष केले होते. परंतु महाविकासआघाडीचे सरकार आल्यावर निंबाळकर समर्थकांनाच कालवा समितीतून वगळण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/