नाथाभाऊंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘मला एकाच व्यक्तीनं छळलं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस’

जळगाव : पोलासनामा ऑनलाइन – मागील तीन दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हल्ला चढवत आहेत. आज खडसे यांच्यावरील पुस्तक प्रकाशानानंतर त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मला एकाच व्यक्तीने जळले आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच, असे म्हणत जी काही कटकारस्थान रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनी रचले असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.

खडसे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काय काय उद्योग केले ते मला महिती आहेत. मी पक्षाच्या विरोधात भाषा केली नाही. मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यानीच, असे एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर जी मीडिया ट्रायल झाली होती, ते या बारभाई कारस्थानातूनच झाली. देवेंद्र फडणवीस यांनीच माझे तिकीट कापले. सर्व कटकारस्थान यांचेच आहे. मी सर्व बाबी नानासाहेब फडणवीस यांचे बारभाई कारस्थान या पुस्तकात देणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

राज्यसभेत पाठवण्याचे आश्वासन

राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीही हरकत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. पण नंतर चार दुसरीच नावं आल्याचे खडसे यांनी सांगितले.