आता पाकिस्तान-चीनची खैर नाही ! ‘उत्तर’ आणि ‘पश्चिम’ सीमा भागात 450 ‘लढाऊ’ विमान तैनात करणार वायुसेना
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय हवाई दल देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमा भागात शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी भविष्यात मोठी पावले उचलण्याचे काम करीत आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) यांनी सोमवारी माहिती दिली की हवाई दल भविष्यात देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमा भागात तैनात करण्यासाठी 450 लढाऊ विमानांची (Fighter Aircraft) खरेदी करेल. यात 36 राफेल विमानांचा देखील समावेश असेल. भारतीय हवाई दलाच्या या हालचालीमुळे पाकिस्तान आणि चीनला भारताकडे नजर टाकण्यापूर्वी बर्याचदा विचार करावा लागेल.
भारतीय हवाई दलाकडून खरेदी करण्यात येत असलेल्या 450 लढाऊ विमानांमध्ये 36 राफेल, 114 मल्टीरोल फायटर एयरक्राफ्ट, 100 अॅडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) आणि 200 पेक्षा जास्त प्रकारचे हलके लढाऊ विमान (एलसीए) समाविष्ट आहेत. वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया म्हणाले की, ‘येत्या 15 वर्षात 83 हलकी लढाऊ विमानांना आमची प्राथमिकता आहे. त्यानंतर एलसीए मार्क 2 आणले जातील. आम्ही अशा सुमारे 100 विमानांवर लक्ष केंद्रित करत आहोत. या सर्वांना मिळवून ही संख्या 200 होईल.’
In future, the Indian Air Force is planning to acquire 450 fighter aircraft for deployment on the northern and western frontiers of the country, said Air Force Chief RKS Bhadauria
Read @ANI Story | https://t.co/fAeEQAOkLM pic.twitter.com/flpoHeIKfN
— ANI Digital (@ani_digital) May 18, 2020
हवाई दलाच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या 450 लढाऊ विमानांना पुढील 35 वर्षांत हवाई दलात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने ही विमाने बनवण्याच्या शक्यतेवर प्रतिक्रिया देताना हवाई दलाच्या प्रमुखांनी कंपन्यांना पुढे येण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी सोमवारी म्हटले आहे की जेव्हा जेव्हा भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ला होईल तेव्हा पाकिस्तानची चिंता वाढली पाहिजे आणि जर त्यांना यापासून बचाव करायचा असेल तर त्यांनी भारतात दहशतवाद पसरविणे थांबविले पाहिजे.
तसेच एअर चीफ मार्शल (Air Chief Marshal) म्हणाले की, जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी छावण्या आणि लॉन्चपॅड्सच्या विरोधात कारवाई करण्याची गरज भासली तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य 24×7 तयार आहे.