नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने केलेल्या एअर स्ट्राईक-२ मध्ये किती अतिरेकी मारले गेले या आकड्यावरून वरून उलट सुलट चर्चा चालू असताना आता भारतीय वायुसेनेने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. माध्यमांशी बोलताना भारतीय वायुदलाचे चीफ एअर मार्शल बीएस धनोया यांनी सांगितले आहे की, “भारतीय वायुसेना मृतांची संख्या सांगण्याचे काम करीत नाही. ते सरकारचे काम आहे. आम्ही हे मोजतो की आम्ही आमचे लक्ष्य भेदले आहे कि नाही.” एअर स्ट्राईक-२ मधील ३५० अतिरेकींच्या मृतांच्या आकड्यावरून भारतीय वायुसेनेने स्पष्टीकरण दिले आहे.
Air Chief Marshal BS Dhanoa on air strikes: IAF is not in a postilion to clarify the number of casualties. The government will clarify that. We don't count human casualties, we count what targets we have hit or not. pic.twitter.com/Ji3Z6JqReB
— ANI (@ANI) March 4, 2019
याबरोबरच त्यांनी म्हंटले आहे की, बॉम्ब जंगलात पडले नसते, तर पाकिस्तानने उत्तर दिलं नसतं, किती अतिरेकी मारले हे मोजणं आमचं काम नाही, एअर स्ट्राईकनंतर वायूसेनेचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण भारतीय वायुसेनेने दिले आहे.
Air Chief Marshal BS Dhanoa on air strikes: The target has been clearly amplified by FS in his statement. If we plan to hit the target, we hit the target, otherwise why would he (Pak PM) have responded, if we dropped bombs in the jungles why would he respond. pic.twitter.com/X4Y0Jdopr6
— ANI (@ANI) March 4, 2019
यासंदर्भातील ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेकडून करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय माध्यमे तसेच काही राजकीय पक्षांकडून देखील एअर स्ट्राईक-२ मध्ये मृतांचा आकडा ३५० असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर आता या अतिरेक्यांच्या मृतांच्या संख्येवरून उलट सुलट चर्चा सुरु आहेत. आता भारतीय वायुसेनेकडून मात्र याबाबत ते आमचे काम नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर संदर्भातील ‘ते’ वृत्त खोटे