ICC World Cup 2019 : टॉस हारताच पाकिस्तान वर्ल्डकपमधून ‘OUT’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धमाकेदार प्रवेश केला. त्याचबरोबर आता सेमीफायनलमध्ये तीन संघांचे स्थान पक्के झाले असून चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. मात्र पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारल्यानंतर देखील पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचू शकणार नाही.

काल न्यूझीलंड पराभवानंतर देखील सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करून आहे. कारण पाकिस्तानपेक्षा न्यूझीलंडचा रनरेट उत्तम असल्याने त्यांना काहीही धोका नाही. मात्र आता शेवटच्या सामन्यात टॉस जरी हरला तरी देखील पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.

असे असतील सेमीफायनलमध्ये जाण्याचे समीकरण

टॉस जिंकून करावी लागेल फलंदाजी –

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात उद्या लॉर्ड्सवर सामना होणार आहे. या सामन्यात त्यांचा पराभव झाल्यास किंवा विजयाची आकडेवारी चुकल्यास थेट वर्ल्डकपमधून बाहेर पडणार आहेत. जर उद्याच्या सामन्यात पाकिस्तान टॉस हारला आणि बांगलादेशने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला तर तिथेच पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडणार. त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर सध्या एकच पर्याय आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला ४०० धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. त्यानंतर बांग्लादेशच्या संघाला ८४ धावांवर ऑलआऊट करावे लागेल त्याचबरोबर जर त्यांनी ३५० धावा केल्या तर बांगलादेशला ३८ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. त्यामुळे हे गणित प्रत्यक्षात शक्य नाही. त्यामुळे पाकिस्तान जवळजवळ वर्ल्डकपमधून बाहेर पडलेलाच आहे.

या संघांनी केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

स्पर्धेच्या ४१ सामन्यानंतर जवळपास सर्व चित्र स्पष्ट झाले असून ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून न्यूझीलंडचा देखील प्रवेश जवळपास निश्चित आहे. कारण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एखाद्या चमत्काराचीच गरज आहे.

 

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात