केएल राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने १३५ धावांची भागिदारी केली. यामध्ये रोहीत शर्माच्या ७४ धावा तर केएल राहुलच्या ५७ धावा आहेत. एका खराब चेंडूवर राहुल बाद झाला. राहुल बाद झाला असला तरी भारताच्या सुरुवातीच्या जोडीने भक्कम पाया तयार केला आहे. रोहितनं यावेळी वन डे कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. त्यानं ३४ चेंडूंत ५० धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये सलग पाच अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं स्थान पटकावलं. अशी कामगिरी यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनी अशी कामगिरी केली आहे. रोहितनं लोकेश राहुलसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना सचिन तेंडुलकर व नवज्योत सिद्धू यांचा विक्रम मोडला.
विश्वचषक स्पधेत आत्तापर्यंत भारत पाकिस्तान सहा वेळे आमने-सामने आले आहेत.
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारत पाकिस्तान या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच माहागात पडला आहे. पहिले षटक निर्धाव टाकून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या राहुल आणि रोहीत या जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत २५ ओव्हरमध्ये एका गड्याच्या मोबदल्यात १४६ धावा केल्या. या सामन्यात हिट मॅन रोहीतने चौकार आणि षटकार खेचत ८१ धावा केल्या.
या सर्व सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. आजचा होणारा सामना जिंकून भारताला विश्वचषकात ७-० ने मनवण्यासाठी ‘विराट’ सेना मैदानात उतरली आहे. आठवडाभर मँचेस्टरमध्ये पाऊस पडत होता, मात्र, कालपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे आजच्या सामन्यावरचं संकट टळलेलं आहे.