न्यूझीलंडनं ‘या’ कारणामुळं विराट कोहलीचं टेंशन वाढवलं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातभारतीय संघाने यजमान विंडीज संघाचा 318 धावांनी दणदणीत पराभव केला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी खाते देखील उघडले. 1 ऑगस्टपासून या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात झाली असू पुढील दोन वर्ष म्हणजेच 2021 पर्यंत हि स्पर्धा चालणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वात वरच्या स्थानावर राहून अंतिम सामना खेळण्याची प्रत्येक संघाची इच्छा आहे.

या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये नऊ संघाचा समावेश असून यामध्ये इंग्लंड, श्रीलंका, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश यांचा समावेश आहे. या अजिंक्यपद स्पर्धेत दोन वर्षात एकूण 27 कसोटी मालिका होणार असून यामध्ये 72 कसोटी सामने खेळवले जाणार असून या स्पर्धेत सुरुवातीला गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी असून विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आरूढ झाला असून न्यूझीलंडने रविवारी श्रीलंकेला पराभूत केल्याने भारतीय कर्णधार विराट कोहली याचे टेन्शन वाढले आहे.

या चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघ होम-अवे अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच विजयाची आणि उत्तम कामगिरी करण्याची समान संधी उपलब्ध आहे. या स्पर्धेत एका कसोटी सामन्यात विजय मिळवल्यास 60 गुण मिळणार असून सर्वात जास्त गन असणारे दोन अव्वल संघ या चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत.

दरम्यान, सध्या भारत, श्रीलंका आणि न्यूझीलंड एकेका विजयासह अनुक्रमे पहिल्या , दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र 30 ऑगस्टपासून विंडीजविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे पहिले स्थान धोक्यात असून न्यूझीलंड या क्रमांकावर कब्जा करू शकतो. यामुळे कर्णधार कोहली याच्या चिंतेत भर पडली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –