सावधान ! 31 डिसेंबरपर्यंत ‘हे’ काम नक्की करा अन्यथा ‘बँक’ अकाऊंट होईल ‘फ्रीज’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयडीबीआय बँकने आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला आहे. बँकेने ग्राहकांना एसएमएस पाठवले आहेत. या एसएमएसमध्ये बँकेने सांगितले आहे की ग्राहकांनी आपले केवायसी डॉक्यूमेंट्स तात्काळ आपल्या होम ब्रांच किंवा एखाद्या जवळच्या शाखेत जमा करावेत. असे न केल्यास बँक खाते आंशीक फ्रीज करण्यात येईल. ग्राहकांना खात्यातून पैसे काढता किंवा जमा करता येणार नाही.
आयडीबीआय बँकने ग्राहकांना आपले केवायसी डॉक्यूमेंट्स जमा करण्यास सांगितले आहे. बँक ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आरबीआयने सर्व बँक खात्यांसाठी केवायसी करणं अनिवार्य केलं आहे.
31 डिसेंबरपर्यंत जमा करता येईल केवायसी डॉक्युमेंट
आयडीबीआय बँक केवायसी डॉक्युमेट जमा करण्यासाठी आपल्या ग्राहकांना 31 डिसेंबर ही अंतिम तारीख कळवली आहे. ही कागदपत्रे तुमच्या होम ब्रांचमध्ये किंवा इतर शाखेत जमा करु शकतात.
तर खाते फ्रीज
बँकेने सांगितले की ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास 1 जानेवारी 2020 पासून बँक खाते आंशिक फ्रीज केले जाईल, ज्यानंतर तुम्ही बँकेतून पैसे काढू अथवा बँकेत पैसे जमा करु शकणार नाहीत. बँकेने सांगितले आहे की कोणत्याही प्रकारची काही समस्या असल्यास आयडीबीआय बँकेच्या शाखेशी संपर्क करावा.
काय आहे केवायसी
केवायसी (Know Your Customer) म्हणजे सोप्या भाषेत आपल्या ग्राहकांबद्दल पूर्ण महिती देणारी प्रक्रिया. केवायसी सर्वांसाठी आवश्यक आहे. केवायसी बँक आणि ग्राहकांमध्ये उत्तम नाते तयार करते. विनाकेवायसी बँकेत गुंतवणूक करणे शक्य नाही. केवायसी न करता तुम्ही बँक खाते देखील सुरु करु शकत नाही. बँकेच्या सेवांचा गैरवापर होत नाही हे पाहण्यासाठी केवायसी असते. केवायसी फॉर्म ऑनलाइन भरता येतात. परंतू कागदपत्र आणि फोटो व्हेरिफिकेशनसाठी एकदा बँकेत जाणे आवश्यक असेल.
- नियमित खजूर खाल्ल्याने होतात ‘हे’ ११ आरोग्य फायदे, जाणून घ्या
- तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट
- नियमित खा शेंगदाणे, होतील ‘हे’ आरोग्यदायी १० फायदे, जाणून घ्या
- तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या
- सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय
- ‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे
- संत्र्यापेक्षा सरस आहे शिमला मिरची ! ‘हे’ आहेत ७ आश्यर्चकारक फायदे