आता शाळा ’या’ पद्धतीनं सुरू होवू शकतात, केंद्र सरकार घेणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   सध्या ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला आहे. तरीही शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरू झालेली नाहीत. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी शाळा ऑनलाईन सुरू केल्यात. यातच आता शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार वेगळ्या पध्दतीने निर्णय घेणार आहे.

कोरोना विषाणूचे थैमान सर्वत्र आहे. यंदा शैक्षणिक वर्ष अजून नीट सुरु झाले नाही. त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालये नेमके कधी सुरु होणार?, याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांनाही उत्सुकता लागलीय.

केंद्र सरकारकडून शाळा आणि कॉलेज सुरु करण्याचा विचार सुरू . त्यानुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत 10 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि महाविद्यालय सुरु करण्याचा विचार आहे. त्यातही, सोशल डिस्टन्स आणि खबरदारी आवश्यक असणार.

केंद्र सरकारकडून सर्वप्रथम उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यानंतर, 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करणार आहे. तसेच, शाळा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर सर्व वर्गांचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. याचबरोबर, शाळेत केवळ 33 टक्के स्टाफला हजर राहण्याची परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारकडून या महिना अखेरीस शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश तसेच शिक्षण सुरू झालेय. कोरोनाच्या भितीमुळे पालकही आपल्या मुलांना शाळेत पाठवायला इच्छुक नाही, असे दिसून आले आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने लॉकडाऊन नंतर अनलॉक 3 ची नियमावली जाहीर केलीय. मात्र, अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू करायला परवानगी दिली नाही.