मायावतींचा विवाह झाला असता तर… : रामदास आठवले

नवी दिल्ली वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींवर जोरदार निशाणा साधला होता. मोदींनी केवळ राजकारणासाठी आपल्या पत्नीला सोडले असा आरोप त्यांनी केला होता. या वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मायावतींना टोला लगावला आहे.

दरम्यान, रामदास आठवले म्हणाले कि, मायावती मोदी जी आणि त्यांच्या पत्नीबद्दल टीका करत आहेत. परंतु मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता करू नये. मायावती यांचा विवाह झाला नसल्याने त्यांना घर संसाराबाबत काहीही माहीत नाही. जर त्यांचा विवाह झाला असता तर त्यांना समजलं असतं पतीला कशाप्रकारे हाताळले जाते. आम्ही मायावतींचा सन्मान करतो पण त्यांनी अशी वक्तव्य करायला नको होती. असे आठवले यांनी म्हंटले आहे.