आंबा खाल्ल्यानंतर ताबडतोब करू नका ‘या’ 5 गोष्टींचं सेवन, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. लोक मोठ्याप्रमाणात आंबे(mango) खात आहेत. पण जेव्हा आपण आंब्याचे (mango)सेवन जेवणाच्या रूपात करतो तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आंब्यासोबत कोणत्या गोष्टीचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये, तसेच यामुळे आरोग्याचे कोणते नुकसान होते, ते जाणून घेवूयात…
1.पाणी पिणे
आंबे खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नका. यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होतो. डायजेशन सिस्टम खराब होते, पोटदुखी, गॅसची समस्या, अॅसिडिटी, ब्लोटिंग इत्यादी समस्या होऊ शकतात. यासाठी आंबा खाल्ल्यानंतर अर्धातासाने पाणी प्या. तसेच आंबा आणि दही एकत्र खाऊ नका.
2 .कारल्याचे सेवन
कारले चवीला कडू आणि आंबा गोड असतो. आंबा खाल्ल्यानंतर ताबडतोब कारल्याची भाजी खाऊ नये. असे केल्याने मळमळ, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
3 .मसालेदार जेवण
आंबा खाल्ल्यानंतर मसालेदार, चटपटीत पदार्थ खाऊ नये. असे केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्कीनवर वाईट प्रभाव पडतो. चेहर्यावर मुरूम इत्यादी होऊ शकते.
4 .कोल्ड ड्रिंक
आंबे खाल्ल्यानंतर ताबडतोब कोल्ड ड्रिंक प्यायल्याने शुगर लेव्हल हाय होऊ शकते. विेशेषकरून जे डायबटीज रूग्ण आहेत त्यांच्यासाठी हे विषासारखे काम करते. म्हणून आंबा खाल्ल्यानंतर कधीही कोल्ड ड्रिंकचे सेवन करू नका.
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या
विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या
LIC ची जबरदस्त योजना ! दररोज करा 233 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 17 लाख रुपये, जाणून घ्या Policy